दिवस राहिल्यापासून मुल मोठे होईपर्यंत त्याची सर्वार्थाने काळजी घेणारी आईच असते. बाळाचा सर्वांगीण विकास घडविताना काय करावे लागते? कोणती पथ्य पाळावी लागतात? हे सर्व या पुस्तिकेमध्ये नमूद केले आहे. आपण गर्भवती आहोत, या गोष्टीचा स्त्रीला आनंद व्हायला हवा. बाळाचे आगमन तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो तो क्षण यशस्वी होण्याच्या दृष्टीने सर्वांगीण तयारी करायला हवी.
गर्भाची संपूर्ण वाढ होण्याच्या दृष्टीने तिने मनावर आणि शरीरावर कोणताही ताण पडू देता कामा नये, प्रथिने, खनिजे, कॅलरीज आणि जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळतील असा आहार तिने गर्भारपणात घ्यायला हवा. दूध, फळे, पालेभाज्या असा आहार उत्तम. तसेच मांसाहार करणाऱ्या स्त्रियांनी अंडी, मांस, मासे या काळात आपल्या आहारात घेत जावे.
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा सर्वांगीण बाजूंनी शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होण्यासाठी आणि हा विकास, ही वाढ कोणत्याही रोगविकाराची बाधा न होऊ देता होण्यासाठी आईने बऱ्याच गोष्टी लक्षपूर्वक आणि कटाक्षाने पाळायला हव्यात.
अंगावरचे दूध हा सर्वात पौष्टिक आहार समजला जातो. बाळासाठी हे निसर्गाने पुरविलेले दूध असते. बाळाला अंगावरचे दूध पाजल्यामुळे बरेच फायदे होतात. त्याला विविध प्रकारच्या संसर्गापासून दूर ठेवता येते. प्रामुख्याने जुलाब हगवणीसारख्या आजारापासून त्याचप्रमाणे ‘क’ जीवनसत्त्वही अंगावरच्या दुधातून मिळत असल्यामुळे बाळाला त्याची कमतरता पडत नाही. ते निर्जंतुक असते, त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. याचबरोबर अंगावर दूध पाजल्याने बाळ आणि आई यांच्यात एक अतुट भावनिक नाते निर्माण होत असते
स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...