शरीरात निम्म्यापेक्षा अधिक वजन पाण्याचेच असते. सर्व पेशींमध्ये आणि पेशींबाहेर पाणी असते. त्यात काही क्षार व इतर पदार्थही असतात. शरीरातील अनेक क्रियांना पाणी लागते. शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यासाठीही पाणी लागते. याची भरपाई करण्यासाठी आपल्याला तहान लागते. पाणी प्यायल्यावर जठर व आतडयातून ते रक्तप्रवाहात शिरते. इथून ते सर्व भागात पोचवले जाते.
शिरेतून दिले जाणारे सलाईन म्हणजे पाणी व ठरावीक प्रमाणात मीठ असते. गरजेप्रमाणे इतरही क्षार व ग्लुकोज साखर सलाईनमध्ये घातलेले असतात, त्यानुसार त्यांची नावे वेगळी असतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/6/2020
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...