अश्रुपिशवीत जास्त प्रमाणात अश्रु साठून राहणे व पापण्या ओल्या होणे.
नवजात अर्भकांमध्ये अश्रुवहननलिका बिघाडामुळे अश्रू हे अश्रुपिशवीतच साठून राहतात किंवा गालांवरून खाली ओघळतात. अश्रू साठवले गेल्यामुळे अश्रुपिशवीत जिवाणू संसर्ग होऊन चिकट पू तयार होतो व तोच अश्रुवहनात अडथळा ठरतो. मुलांमध्ये अश्रुपिशवीच्या ठिकाणी सूज येते व डोळे लाल होतात त्यामुळे अश्रुपिशवीस संसर्ग होतो.
औषधोपचाराचा उपयोग न झाल्यास पूर्ण भूल देऊन शस्त्रक्रिया करावी लागते.
वेळीच औषधोपचार व नलिकेवर दाब देऊन केलेला उपचार शस्त्रक्रिया टाळू शकतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 7/23/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...