निरनिराळया देशांत समाजाच्या आरोग्यमानात काय फरक पडतो हे आपण पाहिले. भारत इतर देशांच्या तुलनेत कोठे आहे ते यावरून दिसेल. निरनिराळया आरोग्यदर्शक कसोटया लावल्यानंतर एक-दोन देश सोडले तर भारताचा क्रम अगदी शेवटीशेवटी लागतो. भारतामध्येही प्रांताप्रांतात तुलना केली तर खूप वेगवेगळे चित्र दिसते. केरळ, पंजाब, हरियाणा या प्रांतातले आरोग्यमान महाराष्ट्र, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, बिहार इत्यादींपेक्षा बरे दिसते. महाराष्ट्रातही खेडयांमधील आरोग्यमान शहरांपेक्षा निकृष्ट दिसते. मुंबई व मोठी शहरे काढल्यास महाराष्ट्राचे आरोग्य मागास दिसते. हा फरक नेमका कशामुळे पडतो ते आता पाहू या.
आरोग्यशिक्षण - आरोग्यमाहिती
या घटकांशिवाय वांशिक वारसा, भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती हे घटकही महत्त्वाचे आहेत. राहणीमानासाठी सध्या मानवविकास निर्देशांक वापरला जातो. याबद्दल आता आपण पाहू या.
स्त्रोत : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
निकोप शरीरसंवर्धनासाठी विद्यार्थांना जे शिक्षण दिल...
प्रत्यक्ष आरोग्यशिक्षण करताना ब-याच अडचणी येतात. त...
भारतातली सध्याची आरोग्यसेवा ही एका अरिष्टात सापडले...
आरोग्यकारक विचारांचा,सवयींचा समाजात प्रसार व्हावा ...