पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमात अंतर्भाव असलेल्या अटींपैकी चराईबंदी हि एक अट चराईबंदीचा अर्थ पाणलोटात सहभागी असलेल्या वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळा असू शकतो .
पाणलोटाच्या कामाचे ,झाडांचे चराईबंदीमुळे सरंक्षण होत असले तरी शेळ्या ,मेंढ्या पाळून गुजराण करणाऱ्यांवर ,त्यावर अवलंबून असणाऱ्यांवर या चराईबंदीचा प्रतिकूल परिणाम होतो.
गावगाड्यातील हा घटक सहसा गरीब असतो .त्यामुळे मेंढपाळ ,धनगर समाजाकडून चराईबंदीला विरोध होता .पाणलोटाच्या कामामुळे पाणी व चाऱ्याची उपलब्धता वाढल्याने त्याचा आपल्याला फायदा होई;फायदा होईल अस काही मेंढपाळांना वाटत ,दुसरीकडे अवघ्या पाणलोट क्षेत्रातीलांच्या भल्यासाठी करण्यात येणाऱ्या पाणलोट विकासाच्या या प्रयत्नात आपल्याला बळीचा बकरा बनवल जातंय हि भावना काही जणांच्या मनामध्ये असते. या ध्वनीचित्रफितीमध्ये चराईबंदी या विषयावर वेगवेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकला आहे.
स्त्रोत -वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020
गाळपाच्या हंगामादरम्यान पुरेसा ऊस उपलब्ध असण्याची ...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
कश्यप ऋषींनी तलावाच्या बांधकामाचे अत्यंत शास्त्रश...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंच...