रस्त्याच्या कडेला पादत्राणे दुरूस्त करुन गुजराण करणाऱ्या कष्टकरी हातांचे उन्हा-तान्हापासून संरक्षण करण्याचे काम शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
रस्त्याच्या कडेला चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरूस्ती करुन उपजिविका चालविणाऱ्या अनुसूचित जातीच्या व्यावसायिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के शासकीय अनुदानातून पत्र्याचे स्टॉल शासनाकडून दिले जातात.
या माध्यमातून कष्टकऱ्यांना हक्काचे आणि मायेचे छत मिळून कष्टाच्या भाकरीची सोय होत आहे.
या योजनेंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल्स व 500 रुपये इतके रोख अनुदान देण्यात येते. योजनेसाठी खालील अटी व शर्ती विहीत करण्यात आलेल्या आहेत.
इच्छुक अर्जदाराने विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रासह/ कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयात सादर करावा.
लेखक - विजय कोळी,
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी.
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 8/8/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...