অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सत्यशोधक समाज

सत्यशोधक समाज

सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रात स्थापन झालेला एक कांतिकारक पंथ. समाजाच्या आमूलाग मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी, तात्त्विक बैठक, कार्य व उपक्रम यांसंबंधी माहिती म. फुले व त्यांच्या अनुयायांनी लिहिलेल्या प्रासंगिक निबंध व छोटीखानी पुस्तिकेतून (सार्वजनिक सत्यधर्म) मिळते.

पार्श्र्वभूमी : एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास पाश्चात्त्य सुधारणेचे स्वागत करणाऱ्या प्रवृत्तीचे तीन प्रवाह महाराष्ट्रात स्वतंत्र रीत्या प्रभावीपणे वाहताना दिसतात. पहिला प्रवाह, धार्मिक सुधारकांचा असून तो मुख्यत्वे बाह्मो समाज (स्थापना १८२८) व प्रार्थनासमाज (स्थापना १८६४) यांत व्यक्त झाला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रामचंद्र गोपाळ भांडारकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर इ. मंडळी यात अगणी होती. दुसरा प्रवाह, बुद्धीवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. आगरकरांसारखे जडवादी किंवा अज्ञेयवादी त्यात अगेसर होते. तिसरा मोठा प्रवाह, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरूद्ध बंड करणाऱ्या बाह्मणेतरांच्या - बहुजनसमाजाच्या - चळवळीचा होता. ह्याचे आदयजनक महात्मा जोतीराव फुले होते. या तिन्ही सुधारणा प्रवाहांची सर्वसंमत वैशिष्टये अशी : (१) पाश्र्चात्त्य विज्ञान पूर्णतः स्वागतार्ह आहे. (२) धर्माशी प्रत्यक्ष सोयरिक नसलेले आधुनिक शिक्षण हाच खरा सुधारणेचा पाया आहे. (३) चातुर्वण्याचे तत्त्वज्ञान किंवा जातिभेद ही संस्था व्यक्तिविकासाला मारक व एकात्म समाजाच्या घडणीतील अडसर असल्यामुळे तिचे समूळ उच्चटन व्हावे; कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या पायावर लोकसत्ताक राज्यव्यवस्था भारतात निर्माण होण्याची गरज आहे; मात्र तत्पूर्वी सामाजिक परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. या सर्व तत्त्व-सूत्रांचा प्रारंभ कुटुंबसंस्थेत आणि विवाहसंस्थेत बदल करण्यापासून होतो. त्याकरिता स्त्री-शिक्षण व स्त्री-स्वातंत्र्य यांचा पुरस्कार अपरिहार्य ठरतो. ही सर्वसंमत वैशिष्टये या तिन्ही सुधारणा प्रवाहांत - चळवळीत असली, तरी महाराष्ट्रातील बहुजनसमाजातील सुधारकांचे - बाह्मणेतर सुधारकांचे-प्रश्न मागासलेल्या बहुसंख्य जनतेच्या जीवनाशी निगडित, तर ब्राह्मण सुधारकांचे प्रश्न पांढरपेशा उच्च्वर्णीयांच्या जीवनाशी संबद्ध होते. त्यामुळे हिंदू धर्माच्या पूर्वपरंपरेवर मूलोच्छेदी प्रहार करण्याची तीव्र व कठोर प्रवृत्ती निर्माण झाली आणि साधारणतः प्रार्थनासमाजाच्या धर्तीवर पण शूद्रातिशूद्रांच्या खास उद्धारार्थ सत्यशोधक समाजाची स्वतंत्र, स्वावलंबी व पुरोगामी विचारांची संघटना स्थापन करण्यात आली.

महात्मा फुले यांच्या या उच्छेदक प्रवृत्तीला अनेक कारणे आहेत. त्यांतील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पेशवाईच्या उत्तरार्धामधील ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ. या काळात, ब्राह्मणी राज्यात जातिभेदाची तीव्र अंमलबजावणी, बाह्मणेतर जातींना दडपण्याची राज्यकर्त्यांची प्रवृत्ती, शूद्राति-शूद्रांची बेफाट पिळवणूक, कायद्याच्या अंमलबजावणीतील ढळढळीत पक्षपात, बेसुमार भ्रष्टाचार व लाचलूचपत अशी बेबंदशाही व अनागोंदी होती. साहजिकच त्या काळी महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी सामाजिक जीवनात बाह्मणांचे धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रांत पूर्ण वर्चस्व होते. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज गुरफटला होता. त्याचा प्रवर्तक व समर्थक वर्ग विशेषेकरून ब्राह्मण वर्ग होता. ह्या चौकटीविरूद्ध बंड करणारी प्रवृत्ती, सत्यशोधक समाजाच्या रूपाने जागृत झाली आणि मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी म. जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या रूपाने धगधगणाऱ्या बंडाचे निशाण हाती घेतले. धर्माचे मनुजवैरी गुंतवळ आणि ते जपणारे समाजघटक यांच्या अनिष्ट प्रवृत्तींविरूद्ध, जवळजवळ सर्व आघाडयावर त्यांनी युद्ध पुकारले.

तात्त्विक बैठक : महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या गंथात सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांची मांडणी केली आहे. धर्मभेद आणि राष्ट्रभेद यांच्याविरूद्ध महान सत्य कोणते, असा प्रश्न उपस्थित करून म. फुल्यांनी म्हटले आहे, ‘‘ स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय होय. सर्व मानव, स्त्री किंवा पुरूष यांचे हक्क सारखे आहेत. मानव किंवा कोणताही मानवसमुदाय यांना दुसऱ्या मानवावर वा समुदायावर स्वामित्व गाजविण्याचा, जबरदस्ती करण्याचा सर्वाधिकार नाही. राजकीय व धार्मिक मतांमुळे कोणतीही व्यक्ती उच्च वा नीच मानून तिचा छळ करणे, म्हणजे सत्याचा द्रोह करणे होय. प्रत्येकाला स्वमताचा प्रसार करण्याचा हक्क व अधिकार आहे. सर्वांना ऐहिक जीवन उपभोगण्याचा सारखाच अधिकार आहे. शेती, कलाकौशल्य, मजुरी आदी कामे माणसास हीनपणा आणीत नसून त्यांच्यायोगे त्याची थोरवीच सिद्ध होते. सृष्टीच्या कार्यकारणभावाचा अर्थ ध्यानी घेऊन त्या सृष्टीचा किंवा निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयोग करणे, हा मनुष्याचा मूलभूत अधिकार व कर्तव्य होय. या विश्र्वात जगण्याकरिता आणि उपभोगाकरिता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळविणे, हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. त्याकरिता परस्परांना साहाय्य करणे, हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे; एवढेच नव्हे, तर ही ईश्वराची पूजा आहे. भजन, नामस्मरण, जपजाप्य, प्रार्थना, भक्ती या गोष्टींची ईश्वराला गरज नाही; कारण तो सर्व विश्र्वाचा स्वामी आहे. त्याला माणसाच्या स्तुतीची, भक्तीची मुळीच गरज नाही. ⇨ बायबल मध्ये येशू क्रिस्तांनी माणसाने माणसाशी कसे वागावे, यासंबंधी केलेला उपदेश माणसाने अंमलात आणला, तर मनुष्यजातीचे जीवन पूर्ण सफल झाले असे समजावे ’’. म. फुले यांनी विशद केलेले हे सत्य म्हणजे हजारो वर्षांच्या परिश्रमाने संपादन केलेल्या संस्कृतीचे आणि ज्ञानाचे सार आहे. त्यांनी सत्यज्ञानाचे साधन किंवा प्रमाण कोणते, यासंबंधी समग चर्चा केली आहे. ‘‘ शुद्ध सत्य हे धर्मगंथात किंवा ऋषी, गुरू, अवतार व ईश्वर, प्रेषित या कुणांमध्येही नाही; ते मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीत वास करते. निसर्गातील सत्य व नैतिक सत्य ही दोन्ही प्राप्त करून देणारी बुद्धी (रीझन) मनुष्यात स्वाभाविकपणे वसत असते. सृष्टिकर्त्यानेच मनुष्यजातीला दिलेली ती नैसर्गिक देणगी आहे. ईश्वराने - निर्मिकाने - मानवाला एकदाच एकच एक ज्ञानाचा दिव्य ठेवा दिला आहे; तो म्हणजे बुद्धी होय ’’. म. फुले यांची सत्यशोधक समाजाविषयीची ही तात्त्विक बैठक पूर्णतः बुद्धीवादी आहे. त्यांना धर्मसंस्था मान्य नाही; मात्र ‘ निर्मिका ’ चे म्हणजे सृष्टिनिर्मात्याचे अस्तित्व ते मान्य करतात. निर्मिकाचे सर्वन्यायीपण सिद्ध करण्यासाठी म. फुले यांनी केलेला सज्जड युक्तिवाद मात्र विज्ञानाच्या कसोटीवर कितपत उतरेल ? याबद्दल शंका आहे.

कार्य व उपक्रम : सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी म. फुले यांनी घटना बनविली. तद्नुषंगाने नियमावली तयार केली.मूलतः सत्यशोधक समाज एकच निर्मिक, एक धर्म, एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. त्याची आचारसंहिता सार्वजनिक सत्यधर्म या गंथात दिली असून, त्यात ढोबळ नियम सांगितले आहेत. त्यांनुसार समाजाच्या कार्यकारिणीत सुरूवातीस म. जोतीराव फुले हे चिटणीस आणि डॉ. विश्राम रामजी घोले हे अध्यक्ष होते. वर्षातून कार्यकारिणीच्या सर्वसाधारण चार सभा, लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळाची निवड व बहुमताने निर्णय, अशी सर्वसाधारण सूत्रे होती. सुरूवातीस दर रविवारी डॉ. गावडे यांच्याकडे अनौपचारिक रीत्या मंडळी जमत. समाजापुढील प्रश्न, सोडवणुकीचे उपाय व सदय:स्थिती यांविषयी चर्चा होत आणि दर पंधरा दिवसांतून एक व्याख्यान असा उपक्रम असे.

सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे. (१) ईश्वर (निर्मिक) एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय (निर्मात्याशिवाय) मी इतर कशाचीही पूजा करणार नाही. (२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. (३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो. (४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही. (५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत; त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही. (६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही. (७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि (८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.

सर्व सभासदांनी सत्याचा प्रसार व सद्विचार लोकांत प्रसृत करून मानवी हक्क व कर्तव्ये यांचा प्रसार-प्रचार वृत्तपत्रे-व्याख्यानांव्दारे करावा. म. फुल्यांनी दलितांना, स्त्रियांना, कष्टकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेतून बाहेर पडण्यासाठी लोकशिक्षणाचा उपक्रम प्राधान्याने हाती घेतला. शिक्षण सर्वांना सहजलभ्य व्हावे आणि सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न केला. विदयेची महती त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या गंथात चपखल शब्दांत वर्णन केली आहे. ते म्हणतात, “विदयेविना मति गेली; मतिविना नीति गेली; नीतिविना गति गेली; गतिविना वित्त गेले; वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले. “ अज्ञानगस्त शूद्रातिशूद्रांच्या शाळांबरोबरच त्यांनी मुलींसाठीही शाळा काढल्या. त्यासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेऊन अध्यापनही केले. ज्ञानवृद्घिकारक उपायांना बळकटी देण्यासाठी त्यांनी गरीब  व होतकरू विदयार्थ्यांना विदयावेतने व हुशार विदयार्थ्यांना बक्षिसे ठेवली. निबंधलेखन व वक्तृत्वस्पर्धा यांना उत्तेजन दिले. वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे एक सहकारी कृ. पां. भालेकर यांनी वसतिगृह स्थापून परगावच्या गरीब विदयार्थ्यांची राहण्याची-जेवण्याची व्यवस्था केली. म. फुल्यांनी हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात (१८८२) सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. पाझरणीच्या सिद्धांताला कडाडून विरोध केला. त्यासाठी लोकहितकारक असे उपायही सुचविले.

सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले. दीनबंधू , दीनमित्र वगैरे वृत्तपत्र-मासिकांतून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी त्यांनी हिरिरीने मांडली. शेतकऱ्याचा आसूड मधून म. फुल्यांनी शासनाच्या नजरेस कृषिवर्गाची दुःस्थिती आणली. त्यामुळेच ‘ डेक्कन अ‍ॅगिकल्चर रिलिफ अ‍ॅक्ट ’ संमत झाला. दीनबंधू वृत्तपत्राने गिरणीकामगारांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला. नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘ मिलहँड असोसिएशन ’ स्थापून, फॅक्टरी आयोगापुढे कामगारांची बाजू मांडली. तसेच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला. जातिभेदखंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार, परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित धर्मदर्शक आणि म. फुल्यांचे सार्वजनिक सत्यधर्म ह्या गंथांचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला. तसेच अनिष्ट अंधश्रद्धामूलक परंपरा, चालीरीती, रूढी यांचे समूळ उच्चटन करण्याचा प्रचार केला. १८७९ मध्ये पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला. शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचे शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले. एवढेच नव्हे, तर भालेकर यांनी ते, विदर्भ व मध्य प्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तेथे सत्यशोधक समाजाचे प्रचारकार्य केले. महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांतून समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या उपकमाला काही अंशी यश लाभले.

महाराष्ट्राबरोबरच बृहन्महाराष्ट्रातील काही शहरांतून म. फुल्यांच्या सत्यशोधक समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या, लोकशिक्षणाच्या चळवळीला वेग आला. कृष्णराव पांडुरंग भालेकर, स्वामी व्यंकय्या रामय्या अय्यावरू, डॉ. विश्राम रामजी घोले, डॉ. संतुजी रामजी लाड, सावळाराम दगडूजी घोलप, महादेव गणेश डोंगरे, हरिश्चंद्र नारायण नवलकर, महादेव राजाराम तारकुंडे, आण्णा बाबाजी लठ्ठे, ज्ञानगिरी बुवा, तात्या पांडुरंग सावंत, वा. रा. कोठारी, सखाराम पाटील, मुकुंदराव गणपत पाटील, अ‍ॅड. गणपतराव कृष्णाजी कदम, भास्करराव जाधव, हनुमंतराव साळुंखे-पाटील, दांडेगावकर, अ‍ॅड. केशवराव बागडे, आनंदस्वामी, रामचंद्र आसवले, केशवराव विचारेगुरूजी, ज्योत्याजीराव फाळके-पाटील, रामचंद्र बाबाजी जाधव उर्फ ‘ दासराम ’, सदोबा गावडे, बंडोबा तरवडे, धोंडीराम नामदेव कुंभार, रामचंद्र गोविंद जामदार, भोसले - सावंत, भाई माधवराव खंडेराव बागल, पुढारी कार ग. गो. जाधव, ‘ सत्यवादी ’ कार बाळासाहेब, समाज कार सर्जेराव पाटील, बाळासाहेब देसाई, रायभान जाधव, अ‍ॅड. झुलाल पाटील, दौलतराव गोळे, व्यंकटअण्णा रणधीर, नलिनीताई लढके, अ‍ॅड. एकनाथराव साळवे, प्राचार्य गजमल माळी, ल. ब. मिसाळ, रामभाऊ फाळके, अ‍ॅड. पी. बी. कडू - पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, अ‍ॅड. डी. एस. खांडेकर, माधवराव मुकुंदराव पाटील, अ‍ॅड. द. रा. शेळके, अ‍ॅड. ना. ह. सावंत, जी. ए. उगले, ग. पां. लोके, बाबा आढाव, हरिभाऊ मुळे, उत्तम नाना पाटील व अ‍ॅड. वसंतराव ऊर्फ भाऊ फाळके-पाटील यांसारख्या मोजता येणार नाहीत अशा अनंत छोट्या-मोठया निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सत्यशोधक चळवळ नेटाने पुढे नेली/आजही प्रयत्न चालू आहेत. परिणामी, संपूर्ण समाजक्रांतीचे युग अवघ्या महाराष्ट्रात सळसळून उभे राहिले. मधे काही काळ, विशेषतः म. फुले यांच्या मृत्यूनंतर (१८९०) तसेच भारताला स्वातंत्र्याची प्राप्ती झाल्यानंतर (१९४७) सत्यशोधक चळवळ खूपच मंदावली, उपेक्षित राहिली; मात्र शंकरराव मोरे, मुकुंदराव पाटील, केशवराव जेधे, भास्करराव जाधव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, दिनकरराव जवळकर, लोकशाहीर पिराजीराव सरनाईक प्रभृती व त्यांचे खंदेबल्लळ सहकारी यांनी सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित केली, गतिमान केली आणि खेड्यापाड्यांतल्या, तळागळातल्या माणसांपर्यंत नेऊन पोहोचविण्याचा आणि रूजविण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांनी ती उभ्या महाराष्ट्रात वाढविण्याचा प्रयत्न केला.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रचंड रणसंग्रामात, सर्वांगीण सामाजिक क्रांतीऐवजी देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला अग्रक्रम राहिला. त्यामुळे सत्यशोधक चळवळ विस्कळीत झाली; तशीच स्वातंत्र्योत्तर काळात, ‘ आता स्वातंत्र्य प्राप्त झालं, उद्दिष्ट साध्य झालं; म्हणजे दुसऱ्या कुठल्या उद्दिष्टाची निकड उरली नाही’, अशी बव्हंशी बहुजन समाजाने समजूत करून घेतली. समोरची उद्दिष्टेही वेगवेगळी झाली. शिवाय मोठया प्रमाणात बाह्मणेतर समाज विविध राजकीय पक्षांत विभागला गेला. अशा काही महत्त्वाच्या कारणांमुळे सत्यशोधक चळवळ नुसती मंदावली असेच नव्हे, तर थंडावलीही अशी इतिहासाची नोंद आहे. मात्र इतिहासाकडे पाठ करून ती पुन्हा उसळी मारून फोफावू लागली, ती धारदार विचारांनी दृढ असलेल्या, कडेलोट झाला तरी मागे हटणार नाही या जिद्दीने पेटलेल्या, त्या त्या काल-परिस्थितीमधील नव्या-जुन्या, छोट्या-मोठया कार्यकर्त्यांच्या-नेतृत्वाच्या अभंग निष्ठांवर ! सांप्रत जाणवणारे तिचे अस्तित्वही याच ज्वलजहाल आधारावर उभे आहे.

गंथव्यवहाराची मांदियाळी : म. फुले यांच्यापासून (१८७३) आजतागायत (२००८) सत्यशोधक चळवळीचे गतिमान, वाढते यश, निरनिराळे उपक्रम, कार्यकम हाती घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर निर्भर आहे. कालमानानुसार त्यात बदल, काही सुधारणा संभवत असल्या तरी, छोट्या-मोठया सभा, शेतकऱ्यांचे मेळावे, शेतकरी-कामकरी-कष्टकऱ्यांच्या संघटना, स्पृश्य-अस्पृश्य-महिला अशा ‘शूद्रातिशूद्र’ समाजघटकासांठी शाळा उघडणे, परिवर्तन शिबिरे आयोजित करणे, नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती, दुष्काळ, महापूर या संकटांच्या वेळी पुनर्वसनशिबिरे आयोजित करणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची/पुलांची कामे घेणे, निबंध लिहून त्याचे वाचन करणे, छोटया छोटया पुस्तिका लिहिणे, सभा-संमेलने-अधिवेशने भरवून बहुजन समाजाला-बाह्मणेतर समाजाला व सरकारला परखडपणे काही गोष्टी सुनावून कृती करायला भाग पाडणे आणि छोटी छोटी नियतकालिके काढून त्यांव्दारा प्रभावी व प्रवाही प्रचार करणे, असे या लोकप्रबोधनकार्याचे सर्वसाधारण स्वरूप राहिले आहे. लोकशाहीमधील लोककल्याणाच्या संस्थांमध्ये प्रवेश करणे, त्यांची स्थापना करणे आणि मोठया प्रमाणात गंथव्यवहाराचे प्रकाशन करणे, हे त्याचेकालसुसंगत असे सांप्रतचे दोन पदर आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील म.फुले समता प्रतिष्ठान, ‘एक गाव, एकपाणवठा ’ किंवा ‘ देवदासींचे पुनर्वसन ’, यांसारख्या चळवळी, भाई माधवराव बागल विदयापीठ (कोल्हापूर) या स्वयंसेवी विदयासंकुलातर्फे शेतकरी-कामगार-महिला-विदयार्थी यांसारख्या दुबळ्या घटकांसाठी सातत्याने राबविले जाणारे विधायक उपक्रम, म. फुले सामाजिक समता प्रतिष्ठानच्या वतीने मागासवर्गीय व तत्सम यांच्या उद्धारार्थ छेडली जाणारी आंदोलने आणि केले जाणारे संघटन अशा संस्था आणि त्यांचे उपक्रम हे सत्यशोधक चळवळीचेच आविष्कार आहेत. वानगीदाखलची ही यादी पुरेशी ठरावी.

अधिवेशने/संमेलने : कमीअधिक प्रमाणात सत्यशोधक चळवळ झपाटयाने/काही वेळा मंदपणे फोफावत असली, तरी सत्यशोधक समाजाच्या वतीने तिच्या ध्येय-उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चळवळीचे हे महायान सुरू होते. लोकजागरण, लोकप्रबोधन, लोकसंघटन आणि नवसमाजनिर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयसिद्धीसाठी हा सारा खटाटोप, हा उभा प्रयास होता. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली; मात्र समाज अधिवेशनांची सुरूवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्षपदी गणपतराव बिरमल होते. पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ‘ मराठवाडा सार्वजनिक सभेचे ’ अध्यक्ष पद्माकरराव मुळे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते. पुणे ते गेवराई या प्रवासामधली सलग ३३ अधिवेशने अशी आहेत : नासिक, ठाणे, सासवड (पुणे), अहमदनगर, निपाणी, आडगाव (जळगाव), अकोला, सातारा, दांडेगाव (हिंगोली), बेळगाव, शेगाव (हिंगोली), अमरावती, मुंबई, पुन्हा मुंबई, कोल्हापूर, पाडळी (सातारा), मौजे भक्तवाडी (सातारा), औरंगाबाद, पुन्हा पाडळी (सातारा), बोराडी (धुळे), पुन्हा नासिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सांगली, मुकुंदवाडी (अहमदनगर), वान्द्रे (पूर्व), अकोला, लातूर, सातारा, पुन्हा औरंगाबाद, चिखली, गेवराई.

या प्रबोधन चळवळीचा भाग म्हणून सत्यशोधक विदयार्थी संघटना काम करीत असल्याचे दिसते. मात्र तिला तसे अधिकृत स्वरूप असल्याचे आढळत नाही. प्रशिक्षण वर्ग भरत असले, तरी त्याचे स्वरूप आस्था असणाऱ्यांपुरते मर्यादित असे. मात्र शेतकऱ्यांचे नेते कांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कल्पनेने सत्यशोधक साहित्यसंस्थेसंबंधी, २००१-०२ मध्ये उचल खाल्ली, अथक प्रयत्नाने ही कल्पना साकार कशी होईल हे पाहिले. स्वतः नागनाथ अण्णा, अ‍ॅड. भाऊ फाळके-पाटील, प्रा. उगले, डॉ. एस्. एस्. भोसले, प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. कल्याणकर, डॉ. आ. ह. साळुंखे, भूमिसत्ता चे संपादक भगतुर, प्रा. गुंदेकर, डॉ. गुरव, प्राचार्य टेकाळे, प्रा. श्याम मुंडे, प्रा. अनिल पाटील, प्रा. गजमल माळी, स्वातंत्र्यसैनिक भा. दो. पाटील, डॉ. काठोळे, प्रा. ढवळे, डॉ. सुरेश सावंत, डॉ. शशी चौधरी प्रभृतींनी कष्टपूर्वक ती लोकमानसात रूजविली. कमाने ‘ सत्यशोधकीय साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदे ’ च्या रीतसर नोंदणीमुळे सत्यशोधक चळवळीला जास्तीचे बळ लाभले आहे. सत्यशोधक कोश निर्मितीचे कार्य (सत्यशोधक चळवळीतील संस्था, व्यक्ती, गंथ आणि नियतकालिके यांचा कोश : १८७३ ते २००६), उदयोगपती पद्माकरराव मुळे यांच्या नेतृत्वाने हाती घेण्यात आले आहे.

सत्यशोधकीय नियतकालिके : सत्यशोधक चळवळीने अनेक प्रचार-माध्यमे उपयोगात आणली. त्यामध्ये सत्यशोधकीय नियतकालिकांचा अगकमाने समावेश करावा लागतो. याव्दारा धार्मिक/सामाजिक क्षेत्रांत जनजागृतीचे अफाट कार्य केले. धर्मचिकित्सा, निरर्थक मूर्तिपूजेस विरोध, समाजाला पिचवून टाकणाऱ्या रूढीपरंपरांच्या चौकटींना नकार, जाति-निर्मूलन, शेतकरी-अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्या उन्नतीसमृद्घीचा कृतिशील विचार, अशा अनेकस्पर्शी उपकमांसाठी या प्रचारमाध्यमांचा, आत्यंतिक कडवेपणाने व निष्ठापूर्वक जाणिवेने सत्यशोधक समाजाकडून अवलंब करण्यात आला. सर्वांगांनी प्रचार, प्रचारकांची निर्मिती, जलसे, मेळे हे तर त्यात होतेच; मात्र चळवळीची म्हणून जी नियतकालिके या काळात निघाली/निघत राहिली त्यांचे स्थान, सत्यशोधक चळवळीच्या इतिहासात अनन्यसाधारण असे आहे. बहुजन समाजाच्या प्रगमनशील, सामाजिक ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा हा लखलखता आविष्कार डोळे दिपविणारा आहे. सर्वसाधारणपणे चार इयत्तापर्यंत शिक्षण झालेले, या नियतकालिकांचे बहुजनसमाजातील संपादक वृत्तपत्रक्षेत्रास अनभिज्ञ होते. अनुभव, पार्श्र्वभूमी, परंपरा, साधने या सगळ्याच दृष्टीने अभावगस्त होते. मात्र समाजासंबंधीची अपार बांधीलकी, अतूट ध्येयवाद आणि अभंग जिद्द अशा पुंजीवर ह्या पत्रकारितेचे गाडे रेटले जात होते. सोने-नाणे गहाण टाकले, जमीन-जुमल्याचा लिलाव झाला, लेखनकामांपासून ते स्वतःच अंक पोस्टात नेऊन टाकण्याचे नित्यकर्म करावे लागले, बायका-मुलांची हेळसांड झाली; पण सत्यशोधक चळवळीतील पत्रकारितेने मागे वळून पाहिले नाही. बहुजनसमाजाच्या अपरंपार आस्थेमुळे एकात्म समाजाच्या निर्मितीच्या समर्पित भावनेमुळे हे घडत गेले.

सत्यशोधक चळवळीच्या ऐन बहराच्या काळात - १८७३ ते १९४० - अशी जवळपास ६०/६५ नियतकालिके निघाली. त्यापुढच्या अर्धशतकाहून अधिकच्या काळात - स्थूलमानाने २००७ अखेर - त्याहून तितकीच किंबहुना त्याहून अधिकच नियतकालिके प्रसिद्ध झाली. त्याची स्थूलमानाने नोंद पुढीलप्रमाणे करणे शक्य आहे :

समाजनिष्ठ ग्रामीण पत्रकारितेचे हे अपूर्व पर्व सुरू झाले ते दीनबंधु (१८७७- कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे) व संत्सार (१८८५- म. फुले) यांच्या पत्रकारितेने. दीनमित्र (१८८८- गणपतराव पाटील), राघवभूषण (१८८८- गुलाबसिंह कौशल्य), अंबालहरी (१८८९- कृष्णराव भालेकर), शेतकऱ्यांचा कैवारी (१८९२- कृष्णराव भालेकर), मराठा दीनबंधू (१९०१- भास्करराव जाधव), दीनमित्र (१९१०- मुकुंदराव पाटील), विश्वबंधू (१९११- बळवंतराव पिसाळ), जागृती (१९१७- भगवंतराव पाळेकर), जागरूक (१९१७- वालचंद कोठारी), डेक्कन रयत (१९१८- अण्णा-साहेब लठ्ठे), विजयी मराठा (१९१९- श्रीपतराव शिंदे), सत्यप्रकाश (१९१९- नारायण रामचंद्र विभुते), गरिबांचा कैवारी (१९२०- बाबूराव यादव), भगवा झेंडा (१९२०- दत्ताजीराव कुरणे), तरूण मराठा (१९२०- सखाराम पांडुरंग सावंत), राष्ट्रवीर (१९२१- शामराव देसाई), प्रबोधन (१९२१- के. सी. ठाकरे), संजीवन (१९२१- द. भि. रणदिवे), सिंध मराठा (१९२४- दत्तात्रय वासुदेव अणावकर), हंटर (१९२५- खंडेराव बागल), मजूर (१९२५- रामचंद्र लाड), कर्मवीर (१९२५- शि. आ. भोसले), नवयुग (१९२६- बाबासाहेब बोले), सत्यवादी (१९२६- बाळासाहेब पाटील), बाह्मणेतर (१९२६- व्यंकटराव गोडे), कैवारी (१९२८- दिनकरराव जवळकर) वगैरे प्रमुख नियतकालिकांची रांगच आहे. मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशांपर्यंत ती पोहोचत होती. त्याचबरोबर जागृती हे नियतकालिक बडोदयाहून, तर सिंध मराठा हे कराचीहून म्हणजे परप्रांतांतून प्रसिद्ध होत होते. राघव भूषण, येवला (जिल्हा नासिक); दीनमित्र, तरवडी (जिल्हा अहमदनगर) अशा ग्रामीण भागांतूनही अशी काही नियतकालिके प्रकाशित होत होती.

सत्यशोधक समाजाचे १९११ ते २००८ अखेरच्या अध्यक्षांची मालिका मोठी असून त्यात एकापेक्षा एक श्रेष्ठ तळमळीच्या समाजकार्यकर्त्यांची मांदियाळी मोठी आहे. सत्यशोधक समाजाची  अध्यक्ष म्हणून धुरा विसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांनी दि. १७ एप्रिल १९११ ते ३१ मार्च १९१२ पर्यंत सांभाळली आणि एकविसाव्या शतकात ही धुरा अ‍ॅड. वसंतराव फाळके (१५ एप्रिल २००१ ते आजतागायत -२००८) समर्थपणे सांभाळीत आहेत. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ हे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेटाने नेत आहेत.

शेती-शेतकरी, कष्टकऱ्यांची दैना, स्त्रिया-अस्पृश्य यांचे दारिद्य, प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता, धर्मचिकित्सा व सामाजिक पुनर्रचना, वंचित व उपेक्षित समाजघटकांचे विदारक प्रश्न, कामगारांचे लढे, त्यांची  एकजूट, अंधश्रद्धांचे निर्मूलन, अधिकाऱ्यांची अरेरावी व खाबुगिरी असे अनंत प्रश्न या नियतकालिकांनी समर्थपणे हाताळले. जे जे जनहिताचे आणि मनुजवैरी व्यवस्थेचे समर्थक, त्या साऱ्यांचा परखड परामर्श अत्यंत निर्भयपणे इथे घेण्यात आला. अतिशय तिखट असे हे वैचारिक बंड आहे. त्याचा उद्देश स्पष्ट असल्याने त्यामध्ये विचारांचे सामर्थ्य ठासून भरले आहे; त्यामानाने वाङ्मयनिर्मितीची कलात्मकता त्यात कमी आढळते, त्यात एकांगीपण, पुनरूक्ती अधिक आहे, बोचरेपणा खूप आहे. झोंबणारा उपहास तीव्र आहे. मात्र त्यातला आवेग, जोश आणि आवेश विलक्षण आहे. सत्यशोधक समाजाच्या आणि त्याव्दारे प्रवर्तित झालेल्या सत्यशोधक चळवळीच्या कार्याचे मूल्यमापन करताना लोकमान्य प्रकांड पंडित तर्कतीर्थ  लक्ष्मणशास्त्री जोशी लिहितात, ‘‘हिंदुस्थानातील तत्कालीन खेडयापाडयांपर्यंत पोहोचलेली आधुनिक भारतामधील सत्य-शोधक चळवळ ही पहिली प्रबोधनपर चळवळ आहे. हजारो वर्षांपासून पिचलेल्या आणि शोषित अशा कष्टकरी जनसमूहाने तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध मानवी जन्म, मानवी पत आणि मानवी प्रतिष्ठा तसेच विषमता, अज्ञान, आत्मोन्नती आणि शोषणमुक्ती यांसाठी पुकारलेली ती विराट लोकचळवळ होती. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि समतेचे जागरण, त्यामधून एकात्म समाज सत्यशोधक चळवळीला अभिप्रेत होता’’. पुढे ते म्हणतात, ‘‘ बाह्मणेतर वादासंबंधीचा खरा झगडा, पूर्वपरंपरेविरूद्ध नवीन ज्ञानाच्या आविष्काराने निर्माण झालेल्या विचारसरणीने उठविलेले बंड हा होता. बाह्मणेतरवाद ही एक विचारसरणी आहे. उच्च्नीचत्वाच्या, जातिभेदाच्या, स्थितिस्थापकत्वाच्या ध्येयाविरूद्ध हा लढा होता. जातिभेद आणि तो कायम ठेवण्यासाठी प्रचारात असलेला सामाजिक ध्येयवाद आणि प्रवर्तक तत्त्वे यांविरूद्ध बाह्मणेतर चळवळ एक बंड आहे.’’ ‘पृथ्वीवर त्या लोकशाही राज्याची संकल्पना ’ तिने मांडली, असा यथार्थ अभिप्राय ज्योतिनिबंध या आपल्या छोटया चणीच्या मोठया पुस्तकात तर्कतीर्थांनी नोंदविला आहे.

संदर्भ : 1. Keer, Dhananjaya, Mahatma Jotirao Phooley : Father of Social Revolution, Bombay, 1974.

२. उगले, जी. ए. सत्यशोधक समाज अधिवेशने : चिंतन आणि चिंता, औरंगाबाद, २००७.

३. जाधव, रा. ग. संपा. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : लेखसंगह, पुणे, १९८२.

४. जोशी, महेश, सत्यशोधक समाजाचा इतिहास, पुणे,१९८७.

५.जोशी, लक्ष्मण-शास्त्री, ज्योतिनिबंध, वाई, १९४७.

६. फडके, य. दि. संपा. महात्मा फुले समग वाङ्‌मय, मुंबई, १९९१.

७. भोसले, एस्. एस्. संपा. कांतिसूक्ते : राजर्षी छत्रपती शाहू महाराज, मुंबई, १९७५.

८. माळी, गजमल,सत्यशोधक समाजाचा इतिहास, औरंगाबाद,२००८.

९. वाघ, प्राजक्ती आणि इतर, संपा. सत्यशोधकीय साहित्य संमेलने-अध्यक्षीय भाषणे, देउळगावराजा, २००७.

१०. साळुंखे, पी. बी. आणि इतर, संपा. महात्मा फुले गौरव गंथ, मुंबई, १९८२.

भोसले, एस्. एस्.; माळी, गजमल

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate