शहरांमध्ये पाणीपुरवठा नद्या व धरणे यांतून होतो, तर खेडयांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांमधून पाणी पुरवले जाते.
पिण्याचे स्वच्छ आणि मुबलक पाणी ही जीवनाची एक मूलभूत गरज आहे. पाणी टंचाईचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा जमाखर्च बिघडणे. एकीकडे शहरांसाठी आणि शेतीसाठी पाण्याचा वाढता वापर ही झाली पाण्याच्या वाढत्या खर्चाची बाजू. मात्र जमिनीच्या पोटातल्या साठयात भर पडत नाही. तसेच जमिनीच्या वरच्या थराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. यामुळे पाण्याच्या जमेची बाजू लंगडी झालेली आहे. पर्यावरण बिघडल्याने पाणी जिरण्याची क्रिया दुबळी झालेली आहे. आता आपल्याला पाणी'अडवा-जिरवा' साठवा-वाचवा कार्यक्रम आवश्यक आहे.
पाणी टंचाईचे कारण काही असले तरी त्याचे परिणाम आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत.
शुध्द पाणीपुरवठा व स्वच्छता या उपायांनी औषधोपचारांची गरज निम्म्याने कमी होईल. आयुर्मान वाढेल व खाल्लेले अन्न चांगले अंगी लागेल. सर्वांना शुध्द आणि भरपूर पाणी मिळणे हा आपल्यासमोरचा मोठा प्रश्न आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
स्त्रोत : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित "संकल्प स्वच्छ महाराष्ट...
शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान 12 हजार रू...
जनावरांच्या शरीराची लवचिकता पाण्यामुळे राहते. पचनक...
पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय सृष्टीतला एकही जीव,...