लहान रांगणाऱ्या बाळांना किंवा त्यांच्यापेक्षा थोडया मोठ्या मुलांना अपघाताचे परिणाम समजणे शक्य नसते. त्यासाठी पालकांनीच काही गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे.
काचेच्या गोट्या, बटणे, मणी, बाटल्यांची झाकणे, चिंचोके, बिया, खडे, मातीची ढेकळे इत्यादी वस्तू मुले तोंडात घालतात. त्यामुळे त्यांना श्वास घेता येत नाही. असे अपघात जर वेळीच लक्षात आले नाहीत तर मुलांना मृत्यू येण्याचा संभव असतो.
औषधांच्या गोळ्या, घासलेट आणि इतर अपायकारक गोष्टी मुलांच्या हाती लागू देऊ नयेत. त्याचप्रमाणे झाडांवर, शेतात मारण्याची जंतूनाशक मुलांपासून दूर ठेवावीत. मुले चुकून ती पितात आणि त्यामुळे अपघात घडतात.
गरम पाणी, चहा, कॉफी, चुलीतले जळते लाकूड, रॉकेलचा दिवा, स्टोव्ह, स्वयंपाकाची गरम भांडी किंवा राख यामुळे मुलांना भाजण्याची भीती असते. अशा गोष्टींपासून मुलांना दूर ठेवावे.
मुलांना उंच जागेवर एकटे झोपवू नये. उंचावरून पडल्यामुळे हाडांना इजा पोहोचते. त्याच प्रमाणे काहीवेळा पाण्याच्या डबक्यात, टाकीत, विहिरीत पडून मुले बुडल्याची उदाहरणे आहेत.
अशा सर्व गोष्टींपासून मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/8/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...