काही वर्षांपूर्वी लोकसंख्यावाढीचा प्रश्न हाच चर्चेत प्रमुख प्रश्न होता. आधी लोकसंख्यावाढ थांबवा मग पुढचे पाहू असा धोशा असायचा. पण काही जण म्हणायचे की विकास झाला की कुटुंबनियोजन आपोआप होईल. लोकसंख्या-नियोजन आधी की मानवविकास आधी?हा वाद कोंबडे आधी की अंडे असा झडायचा. आता दोन्हीचे महत्त्व सर्वांना मान्य झाले आहे. दोन्हीही पाहिजे, आणि एकत्र पाहिजे हा नवा मंत्र आहे.
महात्मा फुले, महर्षी कर्वे,कर्मवीर भाऊराव पाटील आदि तपस्वी माणसांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षणाचा प्रकाश पसरला. पण अजूनही कितीतरी मुले-मुली शाळेत जात नाहीत व गळतीही होते. शाळेत जाणा-यांपैकी अनेकांना लिहितावाचता येत नाही. म्हणजेच शिक्षणाचे प्रमाण व गुणवत्ता वाढायला पाहिजे. याचबरोबर प्रौढ साक्षरतासुध्दा वाढायला पाहिजे. भारताचा या बाबतीत जगात 127वा क्रमांक लागतो.
ब) आर्थिक मिळकत भारतात सुमारे 30 % लोक दारिद्रयरेषेखाली जगतात. यातही स्त्रिया जास्त हलाखीचे जीवन जगतात. आबालवृध्दांचे कुपोषण हे त्याचे एक प्रमुख चिन्ह आहे. महाराष्ट्रात मुंबई-पुण्याची सुबत्ता सोडल्यास इतर प्रांतांप्रमाणेच गरिबी आहे. क) आयुर्मान जीवनाची गुणवत्ता चांगली असल्याचे एक गमक म्हणजे आयुर्मान - जीवनमान. महाराष्ट्रातल्या माणसाचे सरासरी जीवनमान सुमारे 65 वर्षे आहे. प्रगत देशात ते सुमारे 75असते. आपल्याकडे साधारण मृत्यूदर कमी झालेला असला तरी बालमृत्यूदर 40 च्या घरात असल्यामुळे सरासरी आयुर्मान थोडे कमीच आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
जेव्हा डॉक्टर एखाद्या रुग्णास तपासतो तेव्हा ही एक ...