रक्ताप्रमाणे आणखीही एक प्रवाही पदार्थ शरीरात असतो. त्याला (लिंफ) 'रस' असे म्हणतात. हा एक प्रकारचा पातळ पांढरट द्रव (प्रथिने, चरबीयुक्त) असून तो वाहून नेण्यासाठी रसवाहिन्या असतात. या नलिकांवर जागोजागी गाठी (रसग्रंथी) असतात. या गाठींतून 'गाळून' हा रस पुढे नीलेतील अशुध्द रक्तामध्ये मिसळतो. या रसाचे काम म्हणजे रोगजंतू पकडून गाठीमध्ये अडवून ठेवणे व त्यांचा 'बंदोबस्त' करणे. या गाठी जेव्हा सुजतात तेव्हा त्याला आपण 'अवधाण'आले असे म्हणतो. उदा. पायावर जखम झाली तर जांघेतल्या गाठी सुजतात. हातावर जखम असेल तर काखेतल्या गाठी सुजतात. टॉन्सिल्स यादेखील अशाच ग्रंथी आहेत. त्यांचे मुख्य काम घशातले जंतू पकडणे आहे. टॉन्सिल्स काढून टाकल्यावर हे संरक्षण आपण काढून टाकतो. म्हणूनच विनाकारण टॉन्सिल्स काढणे चांगले नाही. या रसग्रंथीमध्ये एक प्रकारच्या पांढ-या पेशी तयार होतात.
हत्तीरोगामध्ये या रसवाहक नलिका बंद होतात. त्यामुळे हत्तीरोग झालेल्या अवयवांमधून प्रथिने, चरबी, इत्यादी गोळा करून आणण्याचे काम बंद होते. त्यामुळे हे पदार्थ जागोजाग साठतात व हत्तीरोगाची सूज येते.निरनिराळया कर्करोगात या गाठी सुजतात व कडक होतात. ही शरीरात कॅन्सर पसरल्याची खूण असते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस तोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे...
बोरापासून घरच्या घरी रस, सरबत, स्क्वॅश तयार करता य...
भाज्या आणि कोशिंबिरीमध्ये लिंबाच्या किंवा संत्र्या...