म्हातारपण लवकर येऊ नये म्हणून काळ थांबत नाही. पण येणारे म्हातारपण- वृध्दत्व आपण काही प्रमाणात पुढे ढकलू शकतो. यासाठी काही मानसिक आणि शारीरिक प्रयत्न हवेत; स्वत:ची योग्य काळजी घ्यायला हवी.
आहारविहारात शिस्त आणि संयम पाळणे, शारीरिक श्रम, आवश्यक तेवढी झोप आणि योग्य आरोग्यविषयक काळजी या काही मूलभूत गोष्टी आहेत. मानसिक आरोग्यासाठी इतर चारचौघांशी किंवा समाजाशी योग्य ते संबंध असावे लागतात. यामुळे वृध्दावस्थेतल्या चिंता, काळज्या यांतून थोडीतरी सुटका होऊ शकते. आपल्यासारख्या दोन चार जणांचा गट असणे तर फार चांगले. पोथी वाचण्यासारख्या धार्मिक परंपरांचा खूप उपयोग होतो.
स्वत:च्या वयोगटातील दोस्तांबरोबरच वृध्दांना लहान मुलांशी रोजचा संबंध असणे हा एक आनंदाचा ठेवा असतो. नातवांनाही आजी-आजोबांचा लळा आणि प्रेम लागते. विभक्त कुटुंबांनी हा आनंदाचा ठेवा मुलांपासून आणि वृध्दांपासून हिरावून घेतला आहे.
शहरात कर्ती माणसे कामासाठी दिवसभर बाहेर पडतात. घरात आणि शेजारीही कोणी नाही अशा अवस्थेत बरेच वृध्द जगतात. खेडयांमध्ये वृध्दांना थोडातरी विरंगुळा असतो कारण अंतर कमी असल्यामुळे एकत्र जमणे सोपे पडते, तसे शहरात होत नाही. शहरांमध्ये हळूहळू वृध्दाश्रम ही गरज होत चालली आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
स्रोत : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 1/28/2020
म्हातारपणात अनेक आजार उगवतात. पण म्हातारपण म्हणजे ...
'वृध्दांसाठी आरोग्यशास्त्र' ही एक आता स्वतंत्र शाख...