त्या त्या कुटुंबाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक घडणीवर घरातल्या वृध्दांची अवस्था अवलंबून असते. कुटुंबातले संबंध कसे आहेत यावर वृध्दांना मिळणारी वागणूकही अवलंबून असते. सर्वांना एकमेकांबद्दल पुरेसे प्रेम आणि आदर असेल तर वृध्दांची काळजी आपोआप घेतली जाते.
आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीशी बरेच वृध्द कसेतरी जुळवून घेतात. पण मानसिक दृष्टया जुळणे थोडे अवघड असते. एकटेपणा हा मोठा शत्रू असतो. जोडीदार नवरा/बायको यापैकी कोणी हयात नसेल तर एकटेपणा काढणे सोपे नसते. कारण त्यांच्या पातळीवर समरस होणे हे इतरांना जमतेच असे नाही. सर्व कुटुंबाचा आणि त्या वयोगटातल्या इतर वृध्दांचा मानसिक आधारही आवश्यक असतो. इतरांचा तुसडेपणा, कठोरपणा वगैरे गोष्टी इतर वयामध्ये सहन केल्या जातात. पण वृध्दांना अशा गोष्टी जिव्हारी लागून राहतात, आणि खंत मनात घर करते.
पुरुष आणि स्त्री यांतला फरक वृध्दपणातही जाणवतो. विधुर माणसे विधवांपेक्षा जास्त दु:खी होतात कारण स्त्रिया मुलाबाळांमध्ये पहिल्यापासून असल्यामुळे त्यांना सोपे जाते. पुरुषाचे तसे नसते. कामधंद्यामुळे त्याला बाहेरच्या जगाची जास्त ओढ असते. ती म्हातारपणात पुरवली जात नाही. भारतात विधवा स्त्रीने एकटे राहणे हे परंपरेने चालत आले आहे. एकटा पुरुष हा त्यामानाने एकाकी पडतो. घरगुती कामात वेळ गेल्यास बहुतेक वृध्दांना जीवन सोपे जाते. त्यामुळे विशेषकरून पुरुषांनी अशा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. काम नसले की म्हातारपण लवकर येते हे खरे आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 4/26/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक...
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालण...
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...