राग किवा क्रोध हा एक नकारात्मक भाव आहे. ही एक आक्रमक प्रतिक्रिया आहे. ती स्वाभाविक असल्याची आपल्या सर्वांची मानसिकता झाली आहे. पण राग आल्यामुळे आपल्या शरीरात काय उलथापालथ होते, याची आपल्याला कल्पना नसते.
वैज्ञानिक दृष्टया तीव्र राग 5 मिनीटे टिकला तर 2 तासाचे काम करण्याची शारिरीक क्षमता कमी होते. आणि त्याची नकारात्मक रासायनिक प्रतिक्रिया शरीरातील सर्व स्नायूंवर 72 तासापर्यंत टिकते. मेंदूला रक्त पोहोचवणार्या सुक्ष्म रक्तवाहीन्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्तिही कमी होते.
म्हणजे रागावून अपण आपल्या शरीराचं तर नुकसान करतोच, पण त्याचबरोबर घरातलं वातावरणही बिघडवतो. म्हणून आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येक क्षणी जागरूक राहून राग आवरायला शिकले पाहीजे.
जो खरा हीरा असतो तो कधीही गरम होत नाही,काच मात्र गरम होते...कधीकधी गरम होऊन तडकते सुध्दा. पण हीरा मात्र आहे तसाच चमकदार रहातो. म्हणून जर आपलं आयुष्य हिर्यासारखं जपायचं असेल तर हिर्यासारखी शीतलता स्वत:मध्ये रुजवायाला हवी. त्यासाठी दृढता आणायाला हावी,दृष्टीकोन बदलायला हवा. तेव्हा आपण काचेपासून हीरा बनायची तयारी करूया.
संकलन अनिल बाप्ते
अंतिम सुधारित : 8/9/2020