देशभरातील शेतीविषयक माहिती एका जागेवर बसून ग्रामीण भागातील शेतक-यांपर्यत पोहोचावी, या उद्देशाने मराठवाडा कृषी विद्यापीठात लवकरच प्रकल्प कार्यान्वित होत आहे.
नॅशनल इ गव्हर्नन्स प्लॅ्न इन ऍग्रो या योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र विभाग विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर देशातील कुठल्याही भागात सध्या असलेली पीक परिस्थिती, त्या ठिकाणी घेतले जाणारे पीक, हवामानाची स्थिती, हवामानाच्या बदलानुसार पीक नियोजनात केलेले बदल, पावसाचे प्रमाण, वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीविषयक सल्ला याबरोबरच कच्चा मालासाठी बाजारपेठ, बाजारपेठेतील भाव आदी माहिती एकाच ठिकाणी असून मिळविणे सहज शक्य होणार आहे. या संगणकासोबत केंद्र शासनाचा शेतीविषयक डाटा उपलब्ध झाला असून राज्य शासन आणि विद्यापीठाचा डाटा बनविण्याचे काम सुरु आहे.
अलीकडच्या काळात हवामानात बदल होत आहे. पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण शेती करण्याऐवजी शेतीतही अचू कता आणणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी मातीपरिक्षण, हवामानाचा अंदाज, शेतीचे नवीन तंत्रज्ञान आणि शास्त्रयज्ञांचा सल्ला वापरुन शेती केल्यास ती निश्चितच फायद्याची ठरेल आणि यासाठी हा प्रकल्प शेतक-यांना फलदायी ठरणार आहे. शेतीमध्ये प्रत्येक गोष्ट् एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे या बाबींची सांगड घालून शेती करणे गरजेचे झाले आहे. या संगणक कक्षात शेतक-यांना प्रत्येूक ठिकाणाची शास्त्रीय माहिती मिळणार आहे. तसेच याच माहितीच्या आधारे पीक नियोजन करणे सोयीचे जाणार असल्याने हा प्रकल्प शेतक-यांसाठी फायद्याचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्तच केली जात आहे.
ई गव्हर्नन्सी प्लॅनमुळे शेतक-यांना त्यांच्या गावात बसून विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे सोपे होणार आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यात त्या गावातील शेतक-यांच्यां गटाशी संपर्क साधून शास्त्रीय सल्ला देणे सोयीचे होणार असल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.
लेखक : राजेंद्र सरग
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत:महान्यूज
अंतिम सुधारित : 6/5/2020
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...