पाण्याचे परीक्षण न करता सिंचनासाठी वापरलेल्या पाण्याचे दुष्परिणाम पिकांच्या वाढीवर, जमिनीच्या गुणधर्मावर, तसेच उत्पादन क्षमतेवर दिसून येतात. अनेक ठिकाणी जमिनी क्षारयुक्त होत असून, जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. त्यात मध्यम काळ्या, तसेच काळ्या जमिनीत पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, पाण्याचे गुणवताविषयक ज्ञान, कालव्यांचे सदोष व्यवस्थापन या बाबींची भर पडली आहे. ही समस्या मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पट्ट्यामध्ये भेडसावत आहे. चिकणमाती असणाऱ्या जमिनीत ही समस्या तीव्र प्रमाणात भेडसावत आहे.
पावसाच्या पाण्यात सर्वसाधारण नत्र, अरगॉन, ऑक्सिजन, कार्बन- डाय- ऑक्साइड व अमोनियाचे प्रमाण असते.
नद्या, तलाव, धरणे, भूगर्भातील पाणी सिंचनासाठी वापरल्यास त्यात विद्राव्य क्षार, वायू, तरंगणारे तंतू व सूक्ष्म सेंद्रिय आणि रासायनिक पदार्थ आढळतात.
पाणी वाहताना मातीतून, झिरपताना खडकामधून जात असते. मातीतील क्षार पाण्यात विरघळतात. साधारणतः क्लोरीन, बायकार्बोनेट, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सोडियम, बोरॉन व लिथियम यासारखे क्षार पाण्यात मिसळले जातात.
सर्वसाधारणपणे पाण्यातील क्षारांची तीव्रता, पाण्यातील एकूण क्षारांचे प्रमाण, सोडिअम स्थिरीकरणाचे गुणोत्तर, पिकांची विम्लता सहन करण्याची शक्ती, जमिनीची रासायनिक व भौतिक गुणधर्म, या सर्व गोष्टींचा पाण्याची उपयुक्तता ठरविताना विचार केला जातो.
1. क्षारता किंवा विद्राव्य क्षार
2. सोडियम स्थिरीकरणाचे गुणोत्तर
3. रेसिड्युअल सोडियम कार्बोनेट
4. बोरॉनचे प्रमाण
5. क्लोराइडचे प्रमाण
6. नायट्रेटचे प्रमाण
7. लिथियमचे प्रमाण
सिंचनासाठी पाण्याचे परीक्षण करताना प्रातिनिधिक पाण्याचा नमुना घेणे आवश्यक असते. पाणी नदी, विहीर, तलाव किंवा कालवा- कोणत्याही स्रोतातील असला तरी नमुना घेताना योग्य पद्धतीने घेणे आवश्यक असते.
क्षारतेवर आधारित सिंचनाच्या पाण्याची प्रतवारी
पाण्यातील क्षारांच्या प्रमाणानुसार आणि पिकांच्या क्षार सहनशक्तीनुसार वेगवेगळी पिके घ्यावीत. आपल्याला अशा पिकांची वर्गवारी खालीलप्रमाणे करता येईल-
पिकांची क्षारता सहन करण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार त्यांचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येईल-
अ) सोडियम स्थिरीकरणाचे गुणोत्तर = सोडियम
(कॅल्शियम + मॅग्नेशियम)/2
रेसिड्युअल सोडियम कार्बोनेटवर आधारित पाण्याची प्रत
क्लोराइड मूलद्रव्यावर आधारित सिंचनाच्या पाण्याची प्रत
अन्य मुलद्रव्यांचे सिंचनाच्या पाण्यात योग्य प्रमाण
भारतात साधारणतः कारखान्यापासून मिळणारे टाकाऊ पाणी ६६ टक्के इतके आहे. या टाकाऊ पाण्यापासून साधारणतः नत्र, स्फुरद व पालाश मिळण्याची क्षमता ५ हजार टन प्रति वर्ष इतकी आहे. कागदाचा कारखाना, युरिया बनविण्याचा कारखाना, वनस्पती तूप व साखर कारखाना यांच्यापासून निघालेले टाकाऊ पाणी हे योग्य व्यवस्थापनानंतर सिंचनासाठी वापरू शकतो, असे निष्कर्ष निघाले आहेत. मात्र कारखान्याच्या टाकाऊ पाण्याचा अयोग्य पद्धतीने वापर केल्यास माती व भूजल प्रदूषित होऊ शकते.
१) कारखान्यानजीकच्या प्रवाही पाण्याचे प्रदूषण -नदी, ओढे इ.
२) भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण - झिंक स्मेंलटर कारखान्याच्या टाकाऊ पाण्यामुळे १ कि.मी. पासून १० कि.मी.पर्यंत भूजलाचे प्रदूषण झाल्याचे आढळले आहे. ३) मातीचे प्रदूषण - तमिळनाडूमध्ये शेतकऱ्यांनी कागदाच्या कारखान्यांचे सांडपाणी १५ वर्षे वापरल्यानंतर मातीच्या गुणधर्मात हानिकारक बदल आढळले.
महाराष्ट्रात विभागवार पाणी परीक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत. त्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, ठाणे, लातूर, धुळे, नागपूर, नगर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग, ठाणे, औरंगाबाद, परभणी, जळगाव, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला यांचा समावेश आहे.
- डॉ. शशिशेखर जावळे - ७५८८१५५४४९
(लेखक डॉ. शशिशेखर जावळे हे जालना कृषी विभागात, तर डॉ. सुनील जावळे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे संशोधक विद्यार्थी आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...